जेएनएन, नागपूर. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केलं.
निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं हल्ला
पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मोठी गंभीर घटना होती. मात्र, ती थोडक्यात टळली, असं ते म्हणाले.
सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल
सध्याची प्राथमिकता पोलिसांना ही परिस्थिती हाताळणे होतं. त्यामुळे सोशल मीडिया सीडीआर हे सगळे तपासले जाणार आहे, त्यामधून कशा पद्धतीने ही सगळी घटना घडत गेली, या सगळ्याची माहिती जेव्हा येईल त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल, असं बावनकुळे म्हणाले. नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
LIVE |📍नागपूर | पत्रकारांशी संवाद (18/03/2025)
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 18, 2025
https://t.co/gnkDhyonwD
परिस्थिती तणावपूर्ण बनवू शकेल अशी विधाने करू नयेत
"आम्ही सर्वांना परिस्थिती तणावपूर्ण बनवू शकेल अशी विधाने करू नयेत असे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांचे कर्तव्य आहे की त्यांनी वातावरण शांत ठेवावे," असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा - Nagpur violence: नागपुरात दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांवरही हल्ला; शांतता ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागपूर पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, 17 मार्च रोजी रात्री नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 50 हून अधिक लोकांचा समावेश आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे इतर कोणाशीही संबंध आहेत याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शहरातील पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी मंगळवारी सांगितले.
हेही वाचा - Nagpur Violence: नागपूर हिंसाचारानंतर 47 जणांना घेतलं ताब्यात, 14 पोलिस जखमी मंत्र्यांची माहिती
11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू
"परिस्थिती आता शांत आहे, आम्ही सुमारे 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे," नागपूर पोलिस आयुक्त म्हणाले.