जेएनएन, मुंबई. Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीदरम्यान नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी 47 जणांना ताब्यात घेतल्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज सकाळी सांगितले.
12 ते 14 पोलिस कर्मचारी जखमी
त्यांनी सांगितले की, सुमारे 12 ते 14 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर दोन ते तीन नागरिकही जखमी झाले आहेत. हिंसाचारामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु त्याची चौकशी सुरू आहे, असं ते म्हणाले.
आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेण्यात आले
"हिंसेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत 12 ते 14 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींना लिगामेंटचा त्रास आहे. दोन ते तीन नागरिकांनाही दुखापत झाली आहे," असं कदम यांनी पत्रकारांना सांगितले.
कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई
"या घटनेमागील कारण आम्ही शोधून काढू. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर दुपारी संपूर्ण प्रकरण मिटवण्यात आले. तथापि, पाच ते सहा तासांच्या अंतरानंतर एका गटाने तोडफोड केली. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे ते म्हणाले.
नागपुरात संचारबंदी लागू
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 163 अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. नागपूर पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील.
हेही वाचा - Nagpur violence: नागपुरात दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांवरही हल्ला; शांतता ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
या भागात संचारबंदी
कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे.
हेही वाचा - Nagpur Violence: नागरिकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
नागपूर पोलिसांचा आदेश
आदेशात म्हटल्याप्रमाणे, पोलीस ठाणे गणेशपेठ नागपूर शहर अतंर्गत काल सकाळी 11:30 वा. दरम्यान शिवाजी महाराज पुतळयासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूरचे कार्यकर्ते एकत्रित येवून सदर ठिकाणी 200 ते 250 कार्यकर्ते जमा होउन औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्या दरम्यान सदर ठिकाणी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देउन औरंगजेबाचा फोटो तसेच त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडयामध्ये (गवताचा पेंडा भरून असलेली) प्रतिकात्मक कबर जाळली.
गणेशपेठ पोलीस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे संध्याकाळी 19.30 वा. सुमारे विशिष्ट समाजातील 80 ते 100 लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांवर दगडफेक केली व तणावाचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांततेला बाधा निर्माण झाली.
हेही वाचा - Nagpur violence: नागपुरात दोन गटात तुफान दगडफेक, पोलिसांवरही हल्ला; शांतता ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
त्याअर्थी, वरील घटनेच्या अनुषंगाने व सार्वजनीक हिताच्या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता मी डॉ. रविंद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (1) (2) (3) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून नागपूर शहरातील परिमंडळ कं. 3 हद्यीतील पोलीस ठाणे कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करीत आहे, असं त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.
#WATCH | Maharashtra: Explosions heard on vehicles that have been torched in Mahal area of Nagpur; tensions have broken out here following a dispute between two groups. pic.twitter.com/rssI72v8od
— ANI (@ANI) March 17, 2025