जेएनएन, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रीमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet decision) घेण्यात आले आहेत. यावेळी ऊर्जा, जल सिंचन आणि अंमली पदार्थ विरोधी पथक निर्मितीसाठी पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे आहेत राज्य मंत्रीमंडळाची निर्णय -

  • म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
  • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
  • सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग) (Sixth State Finance Commission)
  • राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९०  हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा.  (जलसंपदा विभाग) 
  • पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

हेही वाचा - Shiv Jayanti 2025: राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचे पोवाडे लावावेत, मनसेची मागणी