जेएनएन, अमरावती. Samruddhi Expressway Accident: अमरावती जिल्ह्यात समृद्धी द्रुतगती मार्गावर एका उभ्या असलेल्या ट्रकला कार धडकल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धामणगाव रेल्वे हद्दीजवळ हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

त्याने सांगितले की, पीडित एका कार्यक्रमासाठी अकोला येथे जात असताना त्यांची कार रेल्वे हद्दीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली.

एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू

मृतकांमध्ये भास्कर जिवने, गाडी चालवत असलेला त्यांचा मुलगा रमेश, पत्नी लता, सून आरती आणि 10 वर्षांची नात त्रिशा यांचा समावेश असून, हे सर्व चंद्रपूरचे रहिवासी होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस, महामार्ग सुरक्षा पथके आणि बचाव पथके घटनास्थळी तातडीने दाखल झाली आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले, असे त्यांनी सांगितले.

    अपघाताचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नसले तरी, प्राथमिक तपासात चालकाला गाडी चालवताना डुलकी लागली असावी असे सूचित झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.