डिजिटल डेस्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी VB-G RAM G कायद्यावरून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीप्रमाणे राज्यांवर आणि गरिबांवर विनाशकारी हल्ला करत आहेत, असा आरोप केला.
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या या कृतीला विरोध करेल आणि संपूर्ण विरोधी पक्ष याला पाठिंबा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता, प्रकरणाचा अभ्यास न करता एकट्याने MGNREGA ला समाप्त केले आहे. आम्ही याचा विरोध करणार आहोत. मला विश्वास आहे की, संपूर्ण विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल."
5 जानेवारी रोजी 'मनरेगा वाचवा मोहीम'
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या 'मनरेगा वाचवा अभियान'चा उल्लेख करताना हे सांगितले, जे ते 5 जानेवारी रोजी देशभरात सुरू करणार आहेत. यूपीए काळातील मनरेगा हा केवळ एक कामाचा कार्यक्रम नव्हता तर एक विकास चौकट होती ज्याचे जगभरात कौतुक झाले होते, असा दावा केला. मनरेगा रद्द करणे म्हणजे समान्या माणसांच्या हक्कांवर हल्ला आहे. तसंच, हा संघराज्य रचनेवर हल्ला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
गरिबांवर विनाशकारी हल्ला - राहुल
ते म्हणाले, "हा राज्यांवर आणि गरिबांवरचा विनाशकारी हल्ला आहे, जो पंतप्रधानांनी एकट्याने केला आहे, अगदी नोटबंदीप्रमाणेच. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता, प्रकरणाचा अभ्यास न करता एकट्याने मनरेगा रद्द केली."
#WATCH | Delhi: After the CWC meeting, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "...This is an attack on the states of India because they are simply taking away money that belongs to the state, decision-making power that belongs to the state. This is an attack on the… pic.twitter.com/G6tHbpK7hp
— ANI (@ANI) December 27, 2025
मनरेगाची जागा VB-G RAM G कायद्याने घेतली
20 वर्षे जुन्या MGNREGA कायद्याची जागा घेणारे VB-G RAM G विधेयक, विरोधकांच्या तीव्र विरोधादरम्यान संसदेत अलिकडेच हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. नवीन कायद्यात ग्रामीण कामगारांसाठी 125 दिवसांच्या वेतन रोजगाराची तरतूद आहे.
