एएनआय, मोरीगाव. Assam Earthquake News: आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज गुरुवारी पहाटे 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. ही माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) सांगितले की, गुरुवारी रात्री 2:25 मिनिटांनी हा भूकंप झाला आणि त्याचे केंद्र 16 किलोमीटर खोलीवर होते. यापूर्वी मंगळवारी पहाटे बंगालच्या उपसागरात 5.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
गुवाहाटी आणि राज्याच्या इतर भागात जाणवले भूकंपाचे धक्के
गुवाहाटी आणि राज्याच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. 5.0 तीव्रतेचा भूकंप मध्यम मानला जातो, ज्यामध्ये घरातील वस्तू हादरण्याची, खडखडाट होण्याची आणि किरकोळ नुकसान होण्याची शक्यता असते. आसाममध्ये भूकंप होणे सामान्य आहे कारण हे राज्य भारतातील सर्वात भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक आहे.
An earthquake with a magnitude of 5.0 on the Richter Scale hit Morigaon, Assam at 2.25 am today
— ANI (@ANI) February 26, 2025
(Source - National Center for Seismology) pic.twitter.com/iowhZjOJHk
आसाममध्ये तीव्र भूकंपाचा धोका
हे भूकंपीय झोन V मध्ये येते, म्हणजेच येथे जोरदार भूकंपाचा धोका जास्त असतो. अलिकडच्या वर्षांत, या प्रदेशात काही मोठे भूकंप झाले आहेत, जसे की 1950 चा आसाम-तिबेट भूकंप (8.6 तीव्रता) आणि 1897चा शिलाँग भूकंप (8.1 तीव्रता) - हे दोन्ही इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक आहेत. (Assam Earthquake)
हेही वाचा - Mumbai Innovation City: नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा
बंगालच्या उपसागरात भूंकप
बंगालच्या उपसागरात 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर काही दिवसांनी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:10 वाजता भूकंप झाला, असे एनसीएसने म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, ओडिशातील पुरीजवळ भूकंपाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरात 91 किमी खोलीवर भूकंप झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपामुळे कोलकात्यातील रहिवाशांमध्ये क्षणिक भीती निर्माण झाली असली तरी, कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त तात्काळ मिळालेले नाही.