जेएनएन, मुंबई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर पडलेल्या प्रचंड खड्यांमुळे वाहनांची गती मंदावली असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी

घोडबंदर येथील गायमुख परिसरातील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या तसेच गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडीने गंभीर रूप धारण केले आहे.

वाहनांच्या रांगा 

या कोंडीमुळे सुमारे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागले आहेत. परिणामी अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना तासन्तास मार्गावर अडकून राहावे लागत आहे. वाहनांच्या संथ गतीमुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न

    वाहतूक विभागाकडून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडून देण्यात आली आहे.