जेएनएन, मुंबई. Samruddhi Highway Toll News: समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला आज मंगळवारपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धीवरील पथकरात 19 टक्के वाढ केली आहे.

मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये टोल 

परिणामी, कार आणि हलक्या वाहनांना प्रति किमीसाठी सध्याच्या 1.73 रुपयांऐवजी 2.06 रुपये टोल भरावा लागेल. आता मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये टोल द्यावा लागेल. सध्या नागपूर ते इगतपुरी या प्रवासात 1,080 रुपये टोल भरावा लागतो. मात्र, आजपासून 1,290 रुपये टोल भरावा लागेल. एमएसआरडीसीकडून दर तीन वर्षांनी टोलवाढ केली जाते. नवे टोल दर पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत लागू राहतील.

किलोमीटरनिहाय किती वाढ होणार

    असे होते जुने टोलदर!

    समृद्धी महामार्गचे 2022 मध्ये टोलदर कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जात होते. मात्र आता टोलमध्ये वाढ करण्यात आली असून 2028 पर्यंत ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकारीने दिली आहे.

    वाहन प्रकार (दर प्रति किमी/रुपये)सध्यानवे
    कार, हलकी मोटार वाहने1.732.06
    हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बस2.793.32
    बस अथवा दोन आसांचा ट्रक2.856.97
    तीन आसांची व्यावसायिक वाहने6.387.60
    अवजड बांधकाम यंत्रसामग्री9.1810.93
    अति अवजड वाहने11.1713.30