जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Latest Update: पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
पार्थिव येणार मुंबई-पुण्यात
संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे कडाडले, ‘हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्या...’
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अनेक जण अडकले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यात राज्यातील 6 जणांचा समावेश आहे. तर अनेक पर्यटक हे पहलगाम भागात अडकले आहेत. यात बुलढाण्यातील 6 तर नागपुरातील 3 जणांचाही समावेश आहे.