जेएनएन, नवी दिल्ली. IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेला पाचवा आणि मालिकेतील शेवटचा टी 20 सामना रद्द करण्यात आला आहे. भारताने 2-1 ने या सीरीज वर आपले नाव कोरले आहे.
सामन्यात पावसाचा व्यत्यय
सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. खूप वेळ वाट पाहूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला आहे.
🚨 The 5th T20I has been called off due to rain.#TeamIndia win the series 2-1 🏆
— BCCI (@BCCI) November 8, 2025
Scorecard ▶️ https://t.co/V6p4wdCkz1#AUSvIND pic.twitter.com/g6dW5wz1Ci
पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-1 जिंकली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधील गाबा येथे पावसामुळे वाया गेला. तथापि, यामुळे भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यांनी पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
सामना रद्द
ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारतीय डावातील फक्त 4.5 षटके खेळली गेली. त्यानंतर मुसळधार पाऊस आला. खराब हवामान आणि पावसामुळे परिस्थिती खेळण्यास योग्य नसल्याने सामना रद्द करण्यात आला. सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताचा स्कोअर 0 बाद 52 धावांवर होता. अभिषेक शर्मा 23 धावांवर खेळत होता आणि शुभमन गिल 29 धावांवर खेळत होता.

