एजन्सी, नवी दिल्ली. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मागणी केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून दूर करावे किंवा त्यांनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी.
राहुल गांधी यांची सरकारवर टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, 22 लाख नीट (NEET) इच्छुकांची मेहनत वाया गेली आहे. संपूर्ण देशाला माहीत आहे की नीटच्या दोन दिवस आधी त्याची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर वितरित केली जात होती. धर्मेंद्र प्रधानजी म्हणतात की या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही.
"(संसदीय) समितीने शिफारसी केल्या होत्या, पण समितीवर विरोधी पक्षाचे लोक होते आणि तिचा काही उपयोग नाही, असे कारण सांगून त्यांनी त्या कचरापेटीत टाकल्या," असे गांधी यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2026
धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए।
Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW. pic.twitter.com/6FRMMa8AI8
हेही वाचा - NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; पुण्यातील प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक
भारताची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली
सत्य हे आहे की तुम्ही (सरकारने) भारताच्या गाभ्यालाच नुकसान पोहोचवले आहे. "पैसा कमावण्यासाठी विद्यापीठे, कुलगुरू आणि प्राध्यापक पदांवर बसवलेल्या आरएसएस, भाजप आणि त्यांच्या लोकांची ही एक साखळी आहे," असे राहुल गांधी म्हणाले. या साठगाठीने भारताची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
