डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) स्वच्छ वायु सर्वेक्षण 2026 चे निकाल घोषित केले आहेत. या वेळच्या निकालांमध्ये यूपीची राजधानी लखनऊने बाजी मारली आहे. तर, एमपीच्या इंदूरने दुसरे आणि जबलपूरने तिसरे स्थान मिळवले आहे. 

या श्रेणीत देशाची राजधानी दिल्ली 172 गुणांसह 21 व्या स्थानावर आणि मुंबई 160.8 गुणांसह 28 व्या स्थानावर राहिली. तर छत्तीसगडची राजधानी रायपूरने 189  गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. दुर्ग-भिलाई 175.3 गुणांसह 17 व्या स्थानावर राहिला. 

10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले टॉप-10 शहरे

कॅटेगरी-I, ज्यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे समाविष्ट आहेत, त्यात यूपीची राजधानी लखनऊला पहिले स्थान, एमपीच्या इंदूरला दुसरे स्थान, जबलपूरला तिसरे, भोपाळ आणि आग्रा यांना संयुक्तपणे चौथे आणि गुजरातच्या सुरतला पाचवे स्थान मिळाले आहे. तर, रायपूर, ठाणे, चंदिगढ, राजकोट, अहमदाबाद, विजयवाडा, गाझीयाबाद, नवी मुंबई, नागपूर, यांचा अनुक्रमे समावेश आहे. 

कॅटेगरी-II, 3 ते 10 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेली शहरे

कॅटेगरी-II, ज्यामध्ये 3 ते 10 लाखांची लोकसंख्या असलेली शहरे आहेत, त्यात ओडिशाच्या राऊरकेलाने 198.5 गुणांसह पहिले स्थान मिळवले. दुसऱ्या स्थानावर फिरोजाबाद आणि गुंटूर 195 गुणांसह राहिले. तर महाराष्ट्रातील लातूर हे शहर या या कॅटेगरीत 188.5 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. छत्तीसगडच्या कोरबाने 186.5 गुणांसह 10 वे स्थान मिळवले आहे. मध्य प्रदेशातून ग्वाल्हेर 157 गुणांसह 30 व्या, सागर 178 गुणांसह 18 व्या आणि उज्जैन 181.5 गुणांसह 13 व्या स्थानावर राहिला.