Rohit Arya Encounter : मुंबईतील पवई परिसरात जवळपास 15 ते 20 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या उलट फायरिंगमध्ये त्याच्या छातीत गोळी लागली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील पवई परिसरात 'रॉ स्टूडिओ' मध्ये गुरुवारी दुपारी 20 मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 17 मुलांसह २० जणांना ओलिस ठेवणारा आरोपी रोहित आर्य मानसिक रोगी असल्याचे सांगितले जात होते. त्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे.
मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा (Mumbai Hostage Case) पोलीस गोळीबारात मृत्यू झाला आहे. बचाव मोहिमेदरम्यान गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुंबईच्या पवई परिसरात माथेफिरू ‘रोहित आर्य’ने 17 मुलांना ओलीस ठेवण्याची धक्कादायक घटना घडली. प्रकरणात ‘रोहित आर्य’ यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान
‘रोहित आर्य’ ने पोलिसाची बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला .बचावासाठी पोलिसांकडून गोळीबारमध्ये माथेफिरू ‘रोहित आर्य’ मारला गेला. दरम्यान पोलिसांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढून पालकांना सुपूर्द केले आहे.
हे ही वाचा- मुंबईच्या पवईत थरार; माथेफिरूने 20 मुलांना RA स्टुडिओत डांबून ठेवलं, पोलिसांकडून ओलिसांची सुटका, आरोपीला अटक
मुंबईतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याच्या आरोपाखाली गुरुवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही घटना आरए स्टुडिओमध्ये घडली, जिथे पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग घेतले जात होते. 17 मुलांच्या अपहरणापासून ते एन्काउंटरपर्यंच्या घटनाक्रमावर नजर टाकूया.
- गुरुवारी, मुंबईतील पवई येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर 17 मुलांना वेब सिरीजसाठी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते.
- या मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचे नाव रोहित आर्य असे आहे. त्याने एका व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले की त्याने आत्महत्या करण्यापेक्षा मुलांना ओलीस ठेवण्याचा पर्याय निवडला.
- व्हिडिओमध्ये आरोपीने सांगितले की त्याच्या काही साध्या मागण्या आहेत आणि तो त्यावर चर्चा करू इच्छितो. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आर्य मानसिकदृष्ट्या अस्थिर होता.
- पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन सोनवणे यांनी सांगितले की, आरोपीला महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दीपक वसंत केसरकर यांच्याशी काही मुद्द्यावर बोलायचे होते.
- आर्य त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला, "मला एक साधी चर्चा हवी आहे, म्हणूनच मी मुलांना ओलीस ठेवले आहे. मी हे एका योजनेचा भाग म्हणून केले. जर मी जगलो तर मी ते करू शकतो, जर मी मेलो तर दुसरे कोणीतरी करेल, पण ते घडेल. तुमच्याकडून एक छोटीशी चूक मला हे ठिकाण जाळून टाकण्यास प्रवृत्त करेल.
- पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी १:४५ च्या सुमारास त्यांना या घटनेबद्दल फोन आला. त्या कॉलवर कारवाई करत त्यांनी बचाव कार्य संध्याकाळी ४:३० वाजता संपवले. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा ते अयशस्वी झाले, तेव्हा पथकाने जबरदस्तीने आत प्रवेश केला आणि मुलांना वाचवले. ऑपरेशन दरम्यान एक एअर गन देखील जप्त करण्यात आली.
- वृत्तानुसार, आर्य याने पोलिसांवर गोळी चालण्याचा प्रयत्न केला व प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागली. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
- मुंबई पोलिसांनी माथेफिरू रोहित आर्य’ अटक केली.अटक दरम्यान रोहित आर्य’ने पोलिसांकडून बंदूक हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला बचाव दरम्यान पोलिसांच्या गोळीबारमध्ये मारला गेला.
