जेएनएन, जळगाव. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्र.12111) ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. यावेळी मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबईवरुन अमरावतीकडे जात असलेल्या अमरावती डाऊन एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या ट्रकने धडक दिली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून 500 मीटर अंतरावर घडली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्र.12111) ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. त्याचवेळी बंद असलेले रेल्वेगेट तोडून एक ट्रक रेल्वे मार्गात घुसला आणि रेल्वे इंजिनवर जाऊन आदळला. इकडे एक्सप्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ट्रक इंजिनवर धडकताच ट्रकचालक उडी घेत पसार झाला. एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले. नंतर रेल्वे प्रशासनाने ट्रक घटवला. या अपघातामुळे रेल्वेची वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. आता सर्व सुरळीत सुरु आहे.