नवी दिल्ली. Abhishek Sharma meditation celebration: भारताचा टी-20 सलामीवीर अभिषेक शर्माने गुरुवारी अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. त्याने अवघ्या 30 चेंडूंमध्ये आपले शतक ठोकले. शतकानंतर त्याने हटके अंदाजात सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यानंतर त्याने त्यामागील कारण उघड केले आहे.

अभिषेकने 30 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करत भारताचा सर्वात जलद टी20 आंतरराष्ट्रीय शतकवीर बनण्याचा मान मिळवला. त्याने रोहित शर्माचा 33 चेंडूंचा पूर्वीचा विक्रम मोडला. अभिषेकने 34 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार आणि 11 षटकारांसह 108 धावा केल्या.

हटके सेलेब्रेशनमागे काय आहे कारण?

अभिषेकने ध्यानस्थ मुद्रेत बसून आपले शतक साजरे केले. यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले, कारण शतक पूर्ण झाल्यावर फलंदाज सहसा ओरडतात किंवा काहीतरी वेगळेच करतात. अभिषेक सहसा खिशातून कागदाचा तुकडा काढून किंवा हाताने एखादी खूण करून आनंद साजरा करायचा, पण यावेळी त्याने काहीतरी वेगळे केले. याबाबत अभिषेक म्हणाला की, तो गेल्या वर्षभरापासून ध्यानाचा सराव करत आहे, ज्यामुळे त्याला खूप मदत झाली आहे.

प्रसारकाशी बोलताना तो म्हणाला, "मी हे काही काळापासून करत आहे. सहा महिने किंवा एक वर्ष. मी मेडिटेशन आणि मॅनिफेस्टशनवर खूप काम केले आहे, कारण जेव्हा तुम्ही वर्षभर क्रिकेट खेळता, तेव्हा एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला खूप काही अनुभवावे लागते. तुम्ही तुमचे मन शांत कसे ठेवता? मला वाटते की ध्यानाने मला खूप मदत केली आहे."

भारताने सहज विजय मिळवला-

    प्रथम फलंदाजी करताना, अभिषेकच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 221 धावा केल्या. या धावसंख्येसमोर अफगाणिस्तानचा संघ गडबडला आणि 14.1 षटकांत केवळ 94 धावांवर गारद झाला. भारताकडून नितीश कुमार रेड्डी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने दोन बळी मिळवले. जसप्रीत बुमराह आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.