जेएनएन, मुंबई. Raj Thackeray On Language Row: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबाबत एक विधान केलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या विधानावर सविस्तर भूमिका मांडली आहे. भय्याजी जोशी यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (Language Row)
हेही वाचा - KVS Admission 2025-26: केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असतील ही कागदपत्रे, पालकांनी राहावे तयार
राज ठाकरे यांचे भाजपाला सवाल
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.
मराठी जनता दुधखुळी नाही
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा - India-US Trade: अमेरिकन उत्पादनांवर टॅरिफ कमी केल्याने भारताचा फायदा, निर्यात झटपट वाढेल
सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच!
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! असं राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राज ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा - Maha Budget Session 2025: मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार - एकनाथ शिंदे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
— Raj Thackeray (@RajThackeray) March 6, 2025
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी…