हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवाजी महाराजांबद्दल सा-या जगाला कुतूहल आहे. देशात अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज त्या राजांपेक्षा वेगळे कसे होते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. त्यांनी मुघल, निजाम, आदिशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य तयार केलं. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या 16 वर्षी जिंकला होता.
शिवाजी महाराजांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. जनतेचं रक्षण करता यावं म्हणून त्यांनी 100 पेक्षा जास्त किल्ले उभारले.
शिवाजी महाराजांच्या आधी स्थानिक कर्जवसूलदार हे लोकांकडून कोणत्याही नियमाविना शेतसारा गोळा करायचे. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतक-यांकडून वसूल करण्यात येणारा शेतसारा कमी केला.
शिवाजी महाराजांनी शेती करण्यासाठी सरकारी जमीन या लोकांना देऊन त्यांना शेती करण्यास मदत केली. सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली ज्याचा फायदा शेतीला झाला.
शिवाजी महाराज हे फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणूनही लोकप्रिय आहेत. महाराजांनी स्वराज्यात स्वःताचे आरमार उभारले व ४०० पेक्षा अधिक बोटी व जहाजे निर्माण केली.
महाराजांची रयतेला, जनतेला वेठीस धरण्याची त्यांची वृत्ती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या फायद्याचे अनेक कायदे त्यांनी त्यावेळीच तयार केले होते स्त्रियांच्या संरक्षणासंबंधी अनेक कायदे तेव्हा त्यांनी केले होते.
शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक त्यांचे कित्येक अंगरक्षक हे मुस्लिम होते. मुस्लिमांसोबतच 18 पगड जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती.
लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका असे आदेश महाराजांचे होते. शिवाय दुश्मनांच्या एकाही महिलेला इजा केलेली किंवा त्रास दिलेला शिवाजी महाराजांना चालत नव्हतं. सैनिकातील कुणी असे केल्यास ते सैनिकाला कठोर शिक्षा करीत होते.