अनाथांची माय म्हणून सिंधुताई सकपाळ सर्वत्र परिचित आहे. सिंधुताईंनी स्वःत काबाड कष्ट करत, इतरही अनाथांना आधार दिला. आज 4 जानेवारी रोजी त्यांची तिसरी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. जाणून घेऊया सिंधुताईंच्या कुटुंबाबद्दल
सिंधुताई सकपाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यात झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सकपाळ यांच्याशी झाला. काही वर्षांनंतर कौटूंबिक वादामुळे सिंधुताईंना घरातून हाकलवून लावले
सिंधुताईंना घरातून हाकलवून लावले तेव्हा त्या गरोदर होत्या. कुणाच्याही मदतीविना त्यांनी गायीच्या गोठ्यात मुलगी ममताला जन्म दिला.
मुलीच्या जन्मानंतर त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी स्म्शानात राहून चितेवर भाकरी शिजवून भूक भागवली.
स्वःतासाठी जगण्याचा संघर्ष करत सिंधुताईंनी अनाथ मुलांना देखील आश्रय दिला. 1400 पेक्षा अधिक मुलांच्या त्या आई झाल्या.
सिंधुताई सकपाळ यांना 207 जावई, 36 सून आणि 1000 हून अधिक नातवंडे आहेत.
सिंधुताई सकपाळ यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारचा सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्काराने 2021 साली सम्मानित करण्यात आले.
सिंधुताई सकपाळ यांच्या नावाने विविध 7 सेवादायी संस्था चालवल्या जातात. ज्याचा कारभार त्यांची लेक ममता सांभाळते.
महाराष्ट्राची मदर टेरेसा सिंधुताई सकपाळ यांचे 4 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.