जेएनएन, मुंबई. Ashadhi Ekadashi: यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकरीच्या वाहनांना टोल माफी आणि सामूहिक विमा मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

वारीतील वारकरीला संरक्षण देण्यासाठी समूह विमा काढण्यात येईल, सोबतच यंदाही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्य सरकारने आषाढी वारीनिमित्त काल एक बैठक घेतली असून अनेक उपाययोजना आणि वारकरी होणाऱ्या विविध अडचणीचा आढावा बैठकीत घेतला आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदा ही टोलमध्ये सवलत

राज्यात अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे वारीचे अनेक  मार्ग खराब झाले आहे.त्या मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. वारकरील शुद्ध मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनला दिले आहे.वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे यंदा ही टोल मध्ये सवलत दिली जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. 

आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे 

आषाढी वारीत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीलीक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घेणार, असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

    वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका 

    जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत तयारी सुरू केली आहे. वारीदरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकरीला शासनाद्वारे मदत केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्था चोख व्हावी यासाठी पोलिसकडून समन्वयसाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहे. वारकरीसाठी उत्तम भोजन व्यवस्था करण्यात येणार असून यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी असणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.